गुलाम महाराजांच्या अवतार समाप्तीनंतर
रामदास महाराजांकडे कार्याची धूरा
गुलाम महाराजांच्या अवतार समाप्तीनंतर अर्थातच त्यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या कार्याची धूरा त्यांचे बंधू रामदास महाराज यांनी स्विकारली . गुलाम महाराजांचे निर्वाण आप मंडळातील लोकांना मोठा धक्का देणारे होते . त्यांच्यानंतरही रंजनपूरला येणाऱ्या कुटुंबांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती . आता गुलाम महाराजांच्या कार्याचा ध्वज त्यांची स्वामीनिष्ठ पत्नी दगुमाता , जीला लोक आत्यंतिक आदरयुक्त श्रद्धेने सीतामाता म्हणून संबोधू लागले होते त्यांनी आणि त्यांच्याबरोबर सावलीसारखा राहणारा त्यांचा भाऊरामदास यांनी आपल्या हाती घेऊन ते कार्य पुढे नेले . आणि ते करण्याची कुणाची तरी गरज होती ती रामदास महाराजांनी पूर्ण केली . कारण आताशा भिल्ल समाज सन्मानाने वागण्यास शिकत होता .
दारु , गांजा यासारख्या व्यसनातून मुक्त होण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करीत होता . माणूस म्हणून उभा राहण्यासाठी सिद्ध झाला होता . अशातच गुलाम महाराज त्यांच्यातून निघून गेले म्हटल्यावर त्यांना सावरणे आवश्यक होते . त्या दुःखातून त्यांना बाहेर काढून गुलाम महाराज आपल्या भाषणातून जो उपदेशत्याना करीत असत तो नव्याने आपमडळात येणाऱ्या लोकाच्या मनावर बिंबवणे आवश्यक होते , हे कार्य रामदास महाराजांनी स्वीकारले . ज्याप्रमाणे महानुभाव सप्रदायात चक्रधर स्वामीच्या महानुभव पंथातील लोक चक्रधरस्वामीची अवतार समाप्ती झाल्यावर त्यांचे जीवन कार्य आठवून एकमेकानासागत असत . त्याच सकलनकरुनते ' लिळाचरित्र म्हणून प्रसिद्ध झाले . त्याचप्रमाणे गुलाम महाराजाच्या जीवनकार्याच्याआठवणी लोक सांगू लागले .
गुलाम महाराजानाआपल्या कार्याचा प्रचार करण्यासजेमतेमसहा साडेसहा महिने मिळाले . तरीही एवढ्या अत्यल्प काळात त्याचे कार्य खूप वेगाने प्रसारीत होऊन त्यांच्या उपदेशाचा प्रभाव एखाद्या मोहीनी अस्त्राप्रमाणे झाला . मूळातच भिल्ल समाज साधा - भोळा , श्रद्धाळू प्रामाणिक त्या भिल्ल समाजातील गुल्याने बालपणापासूनच शुद्ध राहणीचे आणि उगवत्या सूर्यनारायणाच्या पूजेचे , महादेव - मारुतीच्या मंदिराच्या स्वच्छतेचे व त्यांना पाणी देण्याचे जे व्रत स्विकारले त्यात खंड पडला नाही . सर्वात कठीण व्रत सूर्यनारायणाच्या दर्शनाशिवाय अन्न - पाणी न घेण्याचे , पावसाळ्याच्या दिवसात सूर्य दर्शन दोन - दोन दिवस जरी घडले नाही तरी गुला तेवढे दिवस कडकडीत उपास करीत असे . आपण स्विकारलेल्या व्रत नियमात त्याने कधीच तडजोड केली नाही . ही तपश्चर्याच होती . या तपश्चर्यचे फळ केव्हातरी मिळणारच होते .
त्यामुळे त्याला दैवीशक्ती प्राप्त झाली असे लोक म्हणतात . शुद्ध सात्त्विक विचार सरणीमुळे त्याच्या आत्म्याचेही शुद्धीकरण झाले . रोज आघोळ करून तुळशीला , मारुतीला आणि महादेवाला पाणी दण . सूर्याला ओवाळणे यामुळे तो अंतबाह्य पवित्र झाला होता . साहजिकच सतत समाजाचे भले चिंतण्यात तो आत्ममग्न असल्याने मितभाषी , विनम्र आणि लाजाळू हाता . अशा व्यक्तीलादेवीशक्तीलाभण वात्याचालोकावर महाराज ' म्हणू लागले . प्रभाव पडणे सहज स्वाभाविक होते व आहे . त्यामुळेच लोक त्याला गुल्याने साध्या सरळ उपदेशाला आध्यात्मिक , श्रद्धेचे अधिष्ठान दिले . या सात्विक शक्तीने परमेश्वरी कृपेने त्यांच्या शब्दांना मूल्य प्राप्त झाले .
हजारो लाकत्याचशब्दकानात प्राण आणून एकूलागलव त्याप्रमाण आचरण कालागलकारण इतक्या साप्या आचरणपद्धतीचा आदर्श त्याच्यासमोर स्वत : गुलाममहाराजचहात . त्या आदर्श आचरणाचे अनुकरण करनजगणे त्याच्या हाती होते.या आदशाला श्रद्धेची जोडगुलाम महाराजानी दिल्यावर तत्यालाकाचदेवत , त्याच तारणहार बनल आपसी गुलाम मानाजाने परिध इतर माणसे मात्र चिकित्सकपणे त्यांची टिंगल करीत म्हणत दुनिया झुकती है , झुकानेवाला चाहिए ' हे काहीतरी खुळ आहे , वारे आहे जमे आज आले तसे उद्या निघून जाईल या चळवळीला फार महत्त्व देऊ नये , भिल्लांमध्ये झालेली सुधारणा कायम वटिकाऊआहे असा समज कुणी करून घेऊ नये . असे इतर लोक म्हणत असत .
एखादे चांगले कार्य सुरू झाले की , त्या कार्याचे पुरस्कर्ते व विरोधक , श्रद्धावान व चिकित्सक अशी भिन्न प्रवृत्तीची माणसे त्या चळवळीच्या परस्परविरोधी मते मांडत असतात . तसेच गुलाम महाराजांच्या ' आप चळवळींच्या बाबतीत घडत होते . पण तरीही भिल्ल समाजातील हजारो स्त्री - पुरुषांची श्रद्धा एवढी जबरदस्त होती की , ते कुठल्याच विरोधाला घाबरले नाहीत . त्यामुळे चिकित्सक लोकांच्या मनातील शंका त्यांना उघडपणे प्रकट करण्याची संधी मिळाली नाही , ही सामान्य गोष्ट नव्हती .
काळाच्या उदरात नेमके काय दडले आहे हे कुणी सांगू शकत नाही . आज जे दिसते आहे ते उद्याही तसेच दिसेल अशी खात्री कुणाला देता येत नाही . गुलाममहाराजांचा उदय होण्यापूर्वीच भिल्ल समाज आणि त्या अवघ्या साडे सहा महिन्याच्या समाजोन्नतीच्या प्रबोधन पर्वानंतरचा समाज यात झालला आमुलाग्र बदल कुणी अपेक्षित केला होता का ? प्रत्यक्ष त्या समाजाला , स्वप्नातही वाटले नसेल की , आपला कुणी उद्धारकर्ता उदयाला येऊन आपला पुनर्जन्म होणार आहे ! आपश्री गुलाममहाराजाच्या का साक्षीदार आणि वसा जपणारे अस्तित्वात आहेत . ती त्या अर्थाने भिल्ल समाजाचे कल्याण करणारी ठरली.आजही त्या क्रांतीचे भावी काळात आज दिसणारागुलाम महाराजांचा प्रभाव नष्ट होईल अशी कुकल्पनाकरणारीमाणसेही होती .
आज जो उत्साह आहे तोकृत्रिम आहे . वरवरचा आहे . त्याला खन्या व अतःकरणातून यणाऱ्या श्रद्धचा समाजातघडवून आणलेली क्राती उपरी , कृत्रिम आणि दिखाऊ आहे की महाराजांनी भिल्ल पाठींबा कुठे आहे ही शंका घेणारेही होते . त्यामुळे गुलाम जणू काय मारुती म्हणून पूजू लागले . या मारुतीभोवती सर्व जमा झाले . स्वागतासाठी ढोलकी , झांज वाजवत गावातील इतर सामोरे आले . त्यांच्यासह सर्व मंडळी मिरवणूकीत गुलाम महाराजांचा जयघोष करीत गावात आली .
त्यांच्याच बरोबर ठकारही गेले होते . ते घरात येऊन स्थानापन्न होत नाही तोच रंजनपूरला जाऊन आलेली वयोवृद्ध स्त्री सौ . पार्वती ठकारांना सामोरी गेली ती सौ . पार्वती ठकारांना कुंकू लावण्यासाठी . त्या दोघांची दृष्टादुष्ट झाल्याबरोबर ती भिल्ल स्त्री पार्वती ठकारांना उद्देशून मोठ्या आनंदाने , सुहास्यवदनाने म्हणाली , " आता आम्ही तुमच्यासारखे झालो । " गुलाम महाराजांच्या आपचळवळीचे हे जीवंत उद्गार , हाच जीवंतपणा चळवळीचा सुपरिणाम होय असे शंकरराव ठकार म्हणतात . काल परवापर्यंत जो समाज नित्य अधोमुख , दुर्मुखलेला होता , अबोल होता तो आता उन्नतमुख , टवटवीत , बोलका व निर्भिडझाला होता . गुलाम महाराजांनी घडवून आणलेली ही क्रांती लहान नव्हती .
ज्या समाजातील आबालवृद्ध एखादा पांढरपेशा माणूस वा शाहू पाहिल्यावर बाघ सिंह दिसल्याप्रमाणे सैरावरा पळून जाऊन लपत छपत असत तो समाज आज स्वाभिमानाने डोके वर करून चालू लागला होता . ही आश्चर्यकारक क्रांती गुलाम महाराजांच्या शिकवणूकीतून घडून आली . आमचा पुनर्जन्म झाला ' असे भिल्ल समाजातील लोकांनी म्हणणे म्हणजे त्यांची आत्मोन्नती होण्यासारखेच आहे . या सर्व चळवळीत पुरुषापेक्षा भगिनीवर्गाचा उत्साह अधिक होता हे लक्षात घेण्यासारखे आहे .
म्हणूनच ही ' आप चळवळ चिरस्थायी होईल कारण ' जिच्या हातीपाळण्याची दोरी तीजगाते उदारी ' या सुभाषिताप्रमाणे शकररावहभाकित करतात आणि आत्मविश्वासाने म्हणतात , की मिल समाजातील माझ्या आया बहिणी गुलाम महाराजानी भिक समाजात प्रज्वलीत केलेली हीज्यात अखडतवत ठेवतीलयातशकानाही . अगदी करकर , मळकट , अस्वच्छतेमुळे ओंगळ दिसणान्याभिगिनी गुलाम महाराजाच्या उपदेशाप्रमाणे रोजआंघोळकरू लागल्यामुळवळपाजी कुत कालापी गुजामामाया लावू लागल्यामुळे प्रसन्न दिसू लागल्या . ' जन्मना जायते शूद्रः सस्कारात द्विज उच्चतें ' या वचनानुसार गुलाम महाराजाच्या उपदेशाचे आचरण करणारा सर्व समाज आता ' द्विज ' संज्ञेला प्राप्त झाला आहे .
आणि या सामाजिक क्रांतीचे श्रेय गुलाम महाराजांना जाते . गुलाम महाराजांनी भिल्ल समाजात जी क्रांती केली ती पायाभूत होती . कधी वर तोंड करून , नजरेला नजर न देणारा भिल्ल आता समोरच्या व्यक्तीला त्याच्या प्रश्नांचे उत्तर देऊ लागला . शंकरराव ठकार हे सर्व पाहात होते . म्हणून सहजच एका प्रौढ गृहस्थाला त्यांनी विचारलले काय रे , हे इतके तू कधी शिकलास ? त्यावर त्याने सुहास्यवदनाने पहात शांतपणे उत्तर दिले ' ' दोन महिन्यापूर्वी ! ' कोणी शिकविले रे तुला ? तो अभिमानाने म्हणाला , ' आमच्या गुला महाराजांनी ! ' अशीही गुलाम महाराजांनी घडवून आणलेली सामाजिक क्रांती जी भिल्ल समाज सुधारणेचा पाया आणि शुद्ध क्रांतीचे पहिले पाऊल होते .
जे इतके निर्धारपूर्वक आणि ठासून टाकले होते की त्या पावलावर पावले टाकीत येणारे खरे भाग्यवान ठरले त्यांनी ' आप मंडळात ' आपला सहभाग नोंदवत गुला महाराजांच्या समाजक्रांतीचा पाया अधिक बळकट व मजबूत केला . गुलाम महाराजांनीघडवून आणलेल्या या क्रांतीची शुद्धता व अपूर्वता आणखी एका गोष्टीत दडलेली होती ती म्हणजे आरती समारंभात पतिपत्नींनी मिळून भाग घ्यावा असा दंडक घातला होता . आणि त्याचे भिल्ल समाजाच्या दृष्टीने ते अतिशय औचत्यपूर्ण होते .
या योजनेमुळे कुटुंबेच्या कुटुंबे याक्रांतीत सहभागी झाली . ही या क्रांतीची अपूर्वाई गुलाम महाराजांचा हा पराक्रम वा हे कार्य सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याइतके महत्त्वाचे आहे . त्यामुळे गुलाम महाराजांच्या भिल्लसमाजोन्नतीच्या कार्यात पतीचे तोंडएका दिशेलावपत्नीचे महाराजाच्या कार्य विनाशक प्रकाराला जागाच राहिली नाही . पती - पत्नी दुसऱ्या दिशेला व त्यांनी एकमेकांकडे पाठ फिरविल्यास आणि गुलाम एकमेकाच्या सहकार्याने आरती घेऊन येऊ लागले वदोघे मिळून विशिष्ट सस्कारानी सस्कार सपन्न होऊन जाऊ लागले . ते एकेकटे नाहीतर हजारों मात आपश्री कुटुबाच्या साक्षीने हजारो कुटुब , खुल्या आकाशाच्या छत्राखाली , ग्रहनक्षत्रांना साक्षी ठेवूनच नव्हे तर आपापल्या हातातील दिपज्योतीलाही माक्षी ठेवून ' आप की जय ' म्हणून जनताजनार्दनासमोर ते संस्कार संपन्न होत हे अद्भूत कार्य आश्चर्यकारक तर होतेच पण ते प्रत्यक्षात घडवून आणत होते गुलाम महाराज .
एवढी अपूर्व क्रांती घडवून आणणाऱ्या गुला महाराजांना आपण अज्ञानी व अडाणी कसे म्हणू शकतो . संत गाडगेमहाराजांनी कुठल्या विश्व विद्यालयात शिक्षण घेतले नव्हते . आपला समाजहेच त्यांचे विश्वविद्यालय असल्याने गुलाम महाराजांनी समाजाचे निरीक्षण केले , समाजाचा अभ्यास केला आपल्या समाजाचा सर्वांगीण -हास कोणत्या रोगामुळे झाला आहे याची बिनचूक नाडी ओळखली . आत्मज्ञानाशिवाय विद्वत्ता कस्पटासमान आहे असे अध्यात्मशास्त्रातम्हटले आहे . ते सत्य असले तरी गुलाम महाराज विद्वान नसले तरीत्यांना आत्मज्ञान झाले होते हे मान्य करावे लागेल त्याशिवाय त्यांनी आपल्या समाजाची नाडी ओळखली नसती . आपल्या समाजाचा न्हास नेमका कोणत्या कारणामुळे झालेला आहे .
१ ) पति - पत्नीमधील सैल वैवाहिक संबंधवदुसरे दारूसारख्या महापातकाची गुलामगिरी आणिया दोन्हीचे उच्चाटन झाले तर समाज उन्नत होईलया कारणाने त्यांनी दांपत्याने ( नवरा - बायकोने ) सहआरती आणण्याची जी परंपरा सुरूकेली त्यामुळे कुटुंब स्थिर झाले . पतीपत्नीमधील वैवाहिक संबंध सैल होण्याची व झगडा पद्धतीचे प्रमुख कारण दारुचे व्यसन हेच आहे . ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्याने त्यानी भिल्ल समाजात संपूर्ण दारुबंदी घडवून आणण्याचा उपक्रम केला तो त्याच्या अपूर्व क्रांतीचा सर्वात शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरला .
गुलाम महाराजांच्या प्रेरणेने दारुबंदी किती प्रमाणात झाली हे सागण्यापेक्षा त्याच्या अनुयायानी अतिशय शातीमय मागाने ती घडवून आणली हे महत्वाचे आहे . त्यांनी दारु पिऊ नका असे लोकांना सांगितले वलोकानीदारु साडून दिली . जशी एखादी वस्तूगगार्पण केली असे म्हटले जाते त्याप्रमाणे भिल्लसमाजाने दारुसोडली ती सोडली.आणि भिल्ल समाजात असलेले दारुचे व्यसन लक्षात घेता त्यांनी दारुचे ' नाव ' सुद्धा न घेणे म्हणत कलियुगातील एक दिव्यच होते . कारण मनात येईल तेव्हा दारु तयार का घेता येईल इतकी मोहाची फुलेच काय झाडे त्यांच्या हाताशी होती , दारात अंगणात आपल्या आवडत्या पेयाची साधने असतांना त्यांनी गुलाम महाराजांच्या उपदेशानुसार तत्क्षणी दारु सोडणे म्हणजे अद्भुतच होते .
जगू यक्षिणीच्या कांडीने एखाद्या उजाड माळरानाचे क्षणात सुंदर उपवन तयार व्हावे त्याप्रमाणे गुलाम महाराजांच्या उपदेशरुपी यक्षिणीच्या काडीने भिल्ल समाजातील दारुचे उच्चाटन करण्याचे अद्भूत कार्य अल्पावधीत केले . गुलाम महाराजांच्या उपदेशाने समाज एवढा अंतर्बाह्य बदलून गेल्याचे दिसते कारण समाजाला दारुचे दुष्परिणाम समजू लागले होते . यावरून असेही लक्षात येते की भिल्ल समाज आपली उन्नती करून घेण्याच्या मानसिकतेत होता तो फक्त एखादे निमित्त शोधत होता आणि हे निमित्त झाले गुलाम महाराज . आरती समारंभाला येणाऱ्या लोकांमुळे तळोद्यातील बाजारपेठ कशी बहरुन आली हे आपण पाहिले . त्याचप्रमाणे दारुबंदीमुळे ( भिल्ल समाजाने दारु पिणे बंद केल्यामुळे ) तळोदा तालुक्यातील दारुचे गुत्ते अधिकाधिक ओस पडू लागले .
आज ना उद्या ही चळवळ मागे पडेल या आशेवर दारु गुत्त्याचे मालक दुकान उघडून गिहाईकाची वाट बघत बसायचे , भाव कमी करुन पाहिले . पण काहीही परिणाम झाला नाही . सर्वत्र शुकशुकाट . ( पोळ्याची ) वाट पाहू लागले . परंपराप्रिय लोक निदान या सणाला तरी दार शेवटी एक आधारएक आशाम्हणूनतवाघदेवाच्या सणाचीवचौवरीआमासची पिण्यास येतील असे त्यांना वाटले पण घडले काहीच नाही . गतवर्षी जितक्या एवढा प्रभावगुलाममहाराजाच्या उपदेशाचा झाला होता . अर्थात हा प्रकार शेकड्यानी दारुखपली होती तितक्या रुपयालाही यावर्षी दारु खपली नाही . तळोदा तालुक्यापुरताच होता .
कारण गुलाम महाराजाच्या कार्याचा प्रसार अजून पुढ झाला नव्हता . पण भिल्ल समाजाचे अज्ञान , त्याचा कर्जबाजारीपणा , किंबहुना त्या समाजाचा सर्वागीण मागासलेपणा आणि त्याचे अधःपतनाला कारणीभूत होणारी दारु सोडण्यास गुलाम महाराजांनी प्रवृत्त केले आणि भिल्ल समाजाने दारुसोडली . दहा - दहा वीस मैल पोराबाळांना पाठीशी घेऊन शिळ्याभाकरी खाऊन ते मोरवड पर्यंत पायी चालत येत होते . त्यातून त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दिसत होता . म्हणूनच आप श्री गुलाम महाराज हे भिल्ल समाजाच्या सामाजिक क्रांतीचे आद्य भिल्ल संत पुरुष म्हणावे लागतील . पण त्याची नोंद ना त्या समाजाने घेतली ना इतर कुणाला त्याची गरज वाटली . पण इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे विचार आताची पिढी मांडते तेव्हा त्यांच्या समोर आदर्श वा प्रमाणबिंदू असावा याकरिता गुलाम महाराजांचे चरित्राचे आणि त्यांच्या कार्याचे हे पुनर्लेखन करीत आहे . त्यांच्या चरित्र वाचनाने तरी व्यवसनाधीन पिढीला जगण्याची नवी उर्मी व नवी दिशा सापडेल ही अपेक्षा आहे .
गुलाम महाराजांच्या या अल्पकालीन कार्यानंतर पुढे त्यांचे बंधू रामदास महाराज यांनी हे कार्य हाती घेतले कारण कर्णोपकर्णी गुलाम महाराजांच्या कार्याचा प्रसार होऊलागल्याने त्यांच्या निर्वाणानंतर येणाऱ्यांची संख्या अधिकच वाढू लागली . त्यामुळे कुणीतरी कार्याचा ध्वज घेणे आवश्यक होते . त्याप्रमाणे रामदास महाराजांनी गुलाम महाराजांचा ध्वज हाती घेतला तो १ ९ ३८ च्या गुढीपाडव्याच्या मर्हतावर . गुलाम महाराजांच्या चळवळीवर टिका करणारे , चळवळीला विरोध करणारे गुलाम महाराजांच्या शात आत्मविश्वासाचे तेज मुखावर झळकत असल्याने काही बोलू शकत नव्हते . पण गुलाम महाराजांच्या कार्याचा ध्वज रामदास महाराजांनी हाती घेतला आणि विरोधाची धार तीव्र होण्यास प्रारंभ झाला .
मात्र विरोध वाढण्याच्या आधीची दोन वर्षे रामदास महाराजांनी ' आप चळवळ ' गुलाम महाराजाप्रमाणेच प्रभावी ठेवली . ' आप मूल धर्माची स्थापना झाल्यावर धर्माचे प्रतीकम्हणूनलालरंगाच्या ध्वजाची निवडझाली . अभिवादनासाठी आप की जय ' हा मूल मंत्र दृढ आणि रुढ केला . या पंचाक्षरी मंत्रात जीवनानंदाची भरती आणणारे चुंबकत्व होते . जीवन प्रकाशमय करण्याचे पारित सामर्थ्य होते.ते सामर्थ्य आपमंडपात येणाऱ्या लोकांच्या संख्येवरून दिसून येत होते . त्यामुळे या लोकांना सावरणे आणि गुलाम महाराजाचे कार्य पुढे नेणे ही काळाची गरज होती . गुलाम महाराजांच्या निर्वाणानंतरही दर सोमवारी आरती समारंभाला येणाऱ्या कुटूंबाची संख्या वाढतच होती . येणारी कुटुंबे कोणताही गलबलान करता आपापल्या जागी शांतपणे बसून रहात ऊन , पाऊस , चिखल असला तरी ते स्वस्थ बसलेले असत .
गुलाम महाराजांविषयी असलेली आस्था आणि श्रद्धा त्यांना शांती देत होती . एवढा प्रचंड समाज पण इतका शांत आणि गंभीर बसू शकतो याचेच लोकांना अप्रूप होते . त्यामुळे बघे लोकांचा त्यांना थोडा फार त्रास होत असे . साधारणत : दिवे लागण्याच्या सुमारास सर्व आरत्या पेटविल्या जात असत . रात्री आठच्या सुमारास गुलाम महाराजांनी केलेल्या उपदेशाच्या धर्म फळ्यांची मिरवणूक काढली जात असे . ही मिरवणूक अशा पद्धतीने आरती समारंभासाठी आलेल्या लोकांच्या मधून जाई की प्रत्येकाला आपल्या बसल्याजागेवरूनच त्या धर्मफळ्यांचे दर्शन व्हावे . ज्यांच्यासमोर धर्मफळी आली तो त्या धर्मफळीला श्रद्धायुक्त आदर देण्यासाठी उठून उभा राही आणि लगेच बसून घेत असे . कुठलीही गडबड होत नसे .
अशाप्रकारे मिरवणूक संपली कीगुलाम महाराजांच्या समाधीजवळील चौरंगावर आपश्री सीतामाता , आपश्री रामदास महाराज , शंकर महाराज व त्याचे एक दोन मदतनीस आसनस्थ होत असत . ते आसनस्थ झाले की , त्यांच्या सन्मानार्थ सर्व मंडळी पुन्हा एकदा उभी राहून बसून घेत असे . त्यानतरचा पुढचा सर्व कार्यक्रम लाल ध्वजाच्या संकेतानुसार पार पडे . नव्याने आलेला मनुष्य हे सगळे कसे बिनबोभाट , एक अक्षरही न उच्चारता ध्वजाच्या हालचालीवर कसे घडते . अगदी लष्करी शिस्त असल्याप्रमाणे चाललेला कार्यक्रम पाहून आश्चर्यचकित होत असे . चौरगावरून लहानसालालध्वजवरहात करून फडकविला गेला की , तत्क्षणी हजारोलालध्वज असमतात फडकूलागे . चौरंगावरचालाल ब्रजधावून खाला आलाका , पटापट सर्वध्वज खाली येत . ध्वजाच्याच महाय्याने आरती करण्याची खूण केली जात असे .
खूण होताच हजारो आरत्या आप तत्वासम्हणजे कशासही समजा , ब्रह्मावा जनता जनार्दनास ओबाळू लागत . दिव्यांचे ते फिरणे किती मनोहारी आणि मनाला आनंद देणारे , प्रकाशमय मार्गाकडेचालण्याची दृष्टी देणारे होते . ते दिवे ध्वजाच्या संचलनानुसार वर खाली होत असत , हे दृश्य कुणाचाही ऊर भरुन येईल असेच होते . त्या सर्व आरत्याओवाळतांना सर्वात उच्च स्थानी जेव्हा येत , तेव्हा त्या शांत रात्री सर्व माणसाच्या डोक्यावर त्यांचा प्रकाश येत असे . त्यामुळे ओवाळणारे किंवा त्यांचे हात न दिसता त्या हजारो ज्योतीच आसमंतात लुकलुकताना दिसत . अत्यंत अद्भूत आणि रमणिय असा तो देखावा असे .
प्रत्यक्ष देवतांनाही त्याचा हेवा वाटावा , असे ते दृश्य असे . भूतलावर हजारो पतिपत्नीएकमेकांजवळ उभे राहून जनताजनार्दनापुढे अशा प्रकारे गंभिरपणे आरती ओवाळीत आहे . त्या झगमगत्या ज्योतीची एकाच लयीत होणारी हालचाल अतिशय सुंदर दिसत असे , अतिशय विहंगम दृश्य असे ते ! कोणत्याही दृश्याशी त्याची तुलना करता येणार नाही इतके अप्रतिम दृश्य असे ते ! भिल्ल समाजातील अस्थिर कुटुंबांना स्थैर्य मिळवून देण्यात या आरती समारंभाचे मोठे योगदान आहे . जनताजनार्दनाची आरती झाल्यावर पत्नीने पतीची आरती करायची . एकमेकांजवळ उभे असलेले पतीपत्नी एकमेकांकडे तोंड करून उभे राहात आणि एकाच वेळी सर्व स्त्रिया आपापल्या पतीपुढे आरती घेऊन त्यांची आरती ओवाळत .
हाही सोहळा सामुदायिकरित्या सर्वाकडून एकाचवेळी गंभीरपणे पूर्ण करण्यात येत असे . हा आरतीचा कार्यक्रम पार पडला की चौरंगावरून ध्वज हलविला जाई . सर्वलोकआहे तिथेचस्तब्धहावून , कानातप्राण आणूनचारगावरून येणारा उपदेश ऐकण्याससज्ज होत.एकचित्ताने तो उपदेश ऐकत . चौरंगावरून होणारा आज्ञार्थवाक्य अस.एवढामाठा प्रचडजनसमुदाय असला तरीही कल्पना उपदेश म्हणजे एखादेव्याख्यानवाप्रवचन नसेतरतीनचार शब्दाचे एकक करतावणार नाही . इतकीशातता असे . त्यामुळे हा उपदेशसर्वानास्पटपणे ऐकू येत असे . सामुदायिक कार्यक्रम संपला की चौरंगावरची आपमंडळी शांतपणे निघून जाई आणि नंतर या प्रचंड आपमंडळातील भगिनीया आपापल्या स्नेहीसोबत्यांना , इष्टमित्रांना , नातेवाईकांना ओवाळण्याचे कार्य सुरू करीत . मंगळवारी सकाळी हा सर्व समाज आपापल्या गावाकडे मार्गस्थ होत असे .
0 Comments
Thank you for your response. It will help us to improve in the future.